![]() |
| Vitamin B12 Kami Jhalyas Kay Hote |
ही कमतरता सुरुवातीला हलक्या लक्षणांनी दिसते, पण वेळेत लक्ष दिले नाही तर ती गंभीर स्वरूप धारण करू शकते. विशेषतः शाकाहारी व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते, ज्यामुळे सततचा थकवा आणि नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच व्हिटॅमिन B12 ची कमी कशी ओळखावी आणि ती वाढवण्यासाठी काय उपाय करावे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
शाकाहारी लोकांनी विशेषतः फोर्टिफाइड अन्नावर भर द्यावा.
स्वतःहून सप्लिमेंट सुरू न करता रक्त तपासणी करूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही लक्षणे दिसत असल्यास रक्त चाचणी करून पातळी तपासावी.
व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात?
1. सतत थकवा आणि उर्जेची कमतरता
शरीराला व्हिटॅमिन B12 व्यवस्थित मिळाले तर शरीरात आरबीसी(RBC) तयार होतात आणि ऑक्सिजनची वाहतूक व्यवस्थित होते. पण पातळी कमी झाली तर ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि त्यामुळे अगदी साध्या काम करत असताना सुद्धा कमजोरी जाणवते.2. हातपाय सुन्न होणे किंवा झिणझिण्या येणे
व्हिटॅमिन १२ नसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिटॅमिन १२ ची कमतरता वाढली की तंतू कमजोर होतात. परिणामी हात, पाय, बोटे सुन्न होणे किंवा किरकिर जाणवणे असे त्रास दिसतात.3. स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रीत न होणे
मेंदूला योग्य पोषण न मिळाल्यास एकाग्रता कमी व्हयला लागते किंवा ढासळते. काही लोकांना विसरभोळेपणा वाढल्यासारखे जाणवते. मूड बदलणे किंवा चिडचिड हे देखील Vitamin B12 कमी असल्याचे संकेत असू शकतात.4. त्वचा पिवळसर दिसणे
हिमोग्लोबिन नीट तयार न झाल्यास त्वचेचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागाचा रंग पिवळसर दिसू लागतो. हा एक सामान्य पण गंभीर इशारा असू शकतो.5. श्वास कमी पडणे
शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा आणि ऑक्सिजन न मिळाल्यास थोड्याशा कामातही श्वास लागतो. चक्कर येणे, डोके हलके वाटणे हेही याच कारणामुळे होते.6. जीभ दुखणे किंवा तोंडात फट पडणे
जीभ लाल होणे, दुखणे, खवखवणे, तोंडाच्या दोन्ही बाजूला फट पडणे हे अनेकदा व्हिटॅमिन B12 ची पातळी कमी झाल्याचे संकेत असतात.7. पचनासंबंधी समस्या
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे काही लोकांमध्ये भूक कमी होणे, मळमळ, गॅस किंवा अपचन यासारखे त्रासही दिसू शकतात.व्हिटॅमिन B12 कमी होण्याची कारणे
- पूर्णपणे शाकाहारी आहार: वनस्पतीजन्य पदार्थांत B12 चा अभाव असतो.
- वय वाढणे: वाढत्या वयानुसार शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
- पोटातील आम्ल कमी होणे: अन्नातील जीवनसत्त्वे वेगळी करण्यासाठी पुरेसे ॲसिड नसणे.
- पचनाच्या समस्या: सेलिआक किंवा क्रोहन सारख्या आजारांमुळे शोषण प्रक्रियेत अडथळा येतो.
- अल्कोहोल किंवा धूम्रपान: अतिसेवनामुळे यकृतावर ताण येतो आणि शोषण क्षमता घटते.
- काही औषधांचे दीर्घकाळ सेवन: मधुमेहाची किंवा ॲसिडिटीची औषधे अडथळा ठरू शकतात.
- शस्त्रक्रियेनंतर पचनमार्गातील बदल: वजन कमी करण्याच्या किंवा पोटाच्या शस्त्रक्रियेमुळे शोषण कमी होते.
- पोटात जंत होणे: दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होणारे संसर्ग B12 ची पातळी घटवतात.
ही कारणे B12 शोषण्याची क्षमता कमी करतात.
व्हिटॅमिन B12 वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय1. आहारातून B12 मिळवा
प्राणीजन्य पदार्थ हे B12 चे मुख्य स्त्रोत आहेत. आहारात हे पदार्थ ठेवले तर पातळी नैसर्गिकरित्या सुधारते.- दूध आणि दही
- पनीर आणि चीज
- अंडी
- मासे आणि चिकन
- फोर्टिफाइड सीरिअल्स
- सोया दूध किंवा प्लांट-बेस्ड पेय (B12 जोडलेले)
शाकाहारी लोकांनी विशेषतः फोर्टिफाइड अन्नावर भर द्यावा.
2. सप्लिमेंटचा वापर
जर पातळी खूपच कमी असेल तर डॉक्टर B12 गोळ्या किंवा इंजेक्शन देतात.- गोळ्या दररोज किंवा आठवड्यातून काही वेळा घेतल्या जातात.
- इंजेक्शनने पातळी लवकर वाढते.
स्वतःहून सप्लिमेंट सुरू न करता रक्त तपासणी करूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. पचन सुधारवा
B12 पचनमार्गातूनच शोषले जाते. त्यामुळे पचन ठीक असेल तर B12 योग्य प्रमाणात वापरले जाते.- जेवण वेळेवर करणे
- खूप जास्त चहा-कॉफी टाळणे
- अल्कोहोल कमी करणे
- प्रोबायोटिक पदार्थ खाणे
4. तणाव कमी करा
तणावामुळे पचन बिघडते. त्यामुळे नियमित व्यायाम, ध्यान, चालणे यांचा फायदा होतो.5. वयस्क आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी
या दोन्ही गटांमध्ये B12 ची कमतरता जास्त दिसते. त्यामुळे नियमित तपासणी आणि योग्य आहार गरजेचा आहे.व्हिटॅमिन B12 कधी तपासावे?
- सतत थकवा
- हातपाय सुन्न होणे
- लक्ष कमी होणे
- चक्कर येणे
- त्वचा पिवळसर दिसणे
- जीभ दुखणे
ही लक्षणे दिसत असल्यास रक्त चाचणी करून पातळी तपासावी.
निष्कर्ष
या पोस्ट मध्ये आपण व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास काय होते? याची कारणे, लक्षणे आणि उपाय सविस्तर समजून घेतले. व्हिटॅमिन B12 हे शरीराच्या अनेक महत्त्वाच्या क्रियांना आधार देणारे आणि मज्जासंस्थेचे आरोग्य राखणारे महत्त्वाचे पोषणतत्त्व आहे. त्याची कमतरता दुर्लक्षित केल्यास कायमस्वरूपी थकवा किंवा मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते.त्यामुळे योग्य आहार, गरजेनुसार सप्लिमेंट आणि पचन सुधारण्याच्या सवयी यांकडे विशेष लक्ष द्यावे. रक्तातील पातळी कमी आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेत उपचार घेतले, तर भविष्यातील गंभीर आरोग्य समस्या निश्चितपणे टाळता येतात.

0 टिप्पण्या