![]() |
| Vitamin B12 Kami Jhalyas Kay Hote |
व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात?
1. सतत थकवा आणि उर्जेची कमतरता
शरीराला व्हिटॅमिन B12 व्यवस्थित मिळाले तर शरीरात आरबीसी(RBC) तयार होतात आणि ऑक्सिजनची वाहतूक व्यवस्थित होते. पण पातळी कमी झाली तर ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि त्यामुळे अगदी साध्या काम करत असताना सुद्धा कमजोरी जाणवते.2. हातपाय सुन्न होणे किंवा झिणझिण्या येणे
व्हिटॅमिन १२ नसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिटॅमिन १२ ची कमतरता वाढली की तंतू कमजोर होतात. परिणामी हात, पाय, बोटे सुन्न होणे किंवा किरकिर जाणवणे असे त्रास दिसतात.3. स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रीत न होणे
मेंदूला योग्य पोषण न मिळाल्यास एकाग्रता कमी व्हयला लागते किंवा ढासळते. काही लोकांना विसरभोळेपणा वाढल्यासारखे जाणवते. मूड बदलणे किंवा चिडचिड हे देखील Vitamin B12 कमी असल्याचे संकेत असू शकतात.4. त्वचा पिवळसर दिसणे
हिमोग्लोबिन नीट तयार न झाल्यास त्वचेचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागाचा रंग पिवळसर दिसू लागतो. हा एक सामान्य पण गंभीर इशारा असू शकतो.5. श्वास कमी पडणे
शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा आणि ऑक्सिजन न मिळाल्यास थोड्याशा कामातही श्वास लागतो. चक्कर येणे, डोके हलके वाटणे हेही याच कारणामुळे होते.6. जीभ दुखणे किंवा तोंडात फट पडणे
जीभ लाल होणे, दुखणे, खवखवणे, तोंडाच्या दोन्ही बाजूला फट पडणे हे अनेकदा व्हिटॅमिन B12 ची पातळी कमी झाल्याचे संकेत असतात.7. पचनासंबंधी समस्या
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे काही लोकांमध्ये भूक कमी होणे, मळमळ, गॅस किंवा अपचन यासारखे त्रासही दिसू शकतात.व्हिटॅमिन B12 कमी होण्याची कारणे
- पूर्णपणे शाकाहारी आहार
- वय वाढणे
- पोटातील आम्ल कमी होणे
- पचनाच्या समस्या
- अल्कोहोल किंवा धूम्रपान
- काही औषधांचे दीर्घकाळ सेवन
- शस्त्रक्रियेनंतर पचनमार्गातील बदल
ही कारणे B12 शोषण्याची क्षमता कमी करतात.
व्हिटॅमिन B12 वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय1. आहारातून B12 मिळवा
प्राणीजन्य पदार्थ हे B12 चे मुख्य स्त्रोत आहेत. आहारात हे पदार्थ ठेवले तर पातळी नैसर्गिकरित्या सुधारते.- दूध आणि दही
- पनीर आणि चीज
- अंडी
- मासे आणि चिकन
- फोर्टिफाइड सीरिअल्स
- सोया दूध किंवा प्लांट-बेस्ड पेय (B12 जोडलेले)
शाकाहारी लोकांनी विशेषतः फोर्टिफाइड अन्नावर भर द्यावा.
2. सप्लिमेंटचा वापर
जर पातळी खूपच कमी असेल तर डॉक्टर B12 गोळ्या किंवा इंजेक्शन देतात.- गोळ्या दररोज किंवा आठवड्यातून काही वेळा घेतल्या जातात.
- इंजेक्शनने पातळी लवकर वाढते.
स्वतःहून सप्लिमेंट सुरू न करता रक्त तपासणी करूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. पचन सुधारवा
B12 पचनमार्गातूनच शोषले जाते. त्यामुळे पचन ठीक असेल तर B12 योग्य प्रमाणात वापरले जाते.- जेवण वेळेवर करणे
- खूप जास्त चहा-कॉफी टाळणे
- अल्कोहोल कमी करणे
- प्रोबायोटिक पदार्थ खाणे
4. तणाव कमी करा
तणावामुळे पचन बिघडते. त्यामुळे नियमित व्यायाम, ध्यान, चालणे यांचा फायदा होतो.5. वयस्क आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी
या दोन्ही गटांमध्ये B12 ची कमतरता जास्त दिसते. त्यामुळे नियमित तपासणी आणि योग्य आहार गरजेचा आहे.व्हिटॅमिन B12 कधी तपासावे?
- सतत थकवा
- हातपाय सुन्न होणे
- लक्ष कमी होणे
- चक्कर येणे
- त्वचा पिवळसर दिसणे
- जीभ दुखणे
ही लक्षणे दिसत असल्यास रक्त चाचणी करून पातळी तपासावी.

0 टिप्पण्या